माणिकगड सिमेंट प्रकरण आदीवासीच्या संयमाचा बांध फुटला

 



माणिकगड सिमेंट प्रकरण आदीवासीच्या संयमाचा बांध फुटला 

◾अठरा आदिवासी कुटुंबाचा प्रश्न सुटलेला नाही

◾गेल्या बारा वर्षापासून आदिवासी जमीन प्रकरणाचा संघर्ष सुरू 

◾चुनखडीचे उत्खनन  हापर बंद पाडले

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : गेल्या बारा वर्षापासून आदिवासी जमीन प्रकरणाचा संघर्ष सुरू असून आदिवासींनी सर्व स्तरावर प्रयत्न करून ही शासन प्रशासनाकडून दखल न घेता या कुटुंबांना उघड्यावर पाडले याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन यांच्या समक्ष सभा बैठका पार पडल्या परंतु अठरा आदिवासी कुटुंबाचा प्रश्न सुटलेला नाही गेल्या सात महिन्यापासून कुसुंबी माईन्स क्षेत्रामध्येआदिवासी कोलामांनी ठिय्या आंदोलन सुरू असून हिवाळ्याची थंडी उन्हाळ्याच्या तापमान व आता पावसाळ्याच्या झळा सहन करण्याची दुर्दैव या आदिवासीच्या माथी आली आहे.

 माणिकगड सिमेंट कंपनीच्या मौजा कुसुंबी नोकारी बाम्बझरीशिवारातील जमिनी भूपृष्ठ अधिकारावर या कंपनीने चुनखडी उत्खननाकरिता देण्यात आले होते मात्र या कंपनीला प्रथम लिजकरा 643.62 हेक्टर क्षेत्र लीज करार करण्यात आला होता त्यानंतर 150 हेक्टर जमीन वन विभागाला समर्पित करण्यात आली कंपनीकडे 493 हेक्टर जमिनीचा अधिकृत लिजकरार करण्यात आला व यात जमिनीचा चार वेळा नूतनीकरण देखील करण्यात आले.

 मात्र आदिवासीची कधीच संमती घेण्यात आलेली नाही 63,62 हेक्टर जमिनीचा मोबदला 1984 दरम्यान दिला मात्र सदर निजाम काळातील जमिनी  आदिवासीच्या ताब्यात होत्या, या ठिकाणी वन विभाग महसूल विभाग यांच्या जमिनीचा घोळ असून नकाशाप्रमाणे कंपनीने 493 हेक्टर जमिनीचा सीमांकन भूमापन मोजणी नकाशा दुरुस्त केलेला नाही व यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी नोकरी येथील आदिवासी समाजाच्या 30 हेक्टर जमीन बनावट शासनाची मंजुरी दाखवून थेट कंपनीच्या नावाने खरेदी करण्यात आल्या.

 याबाबत फेरफार करताना या जमिनी सिलिंग दाखवण्यात आल्या सर्व चुकीच्या प्रक्रिया करून तेरा आदिवासींची जमीन नोकारी शिवारातील कंपनीने नगररचना विभागाचे आराखडा नकाशा मंजुरी नसताना बांधकामाची परवानगी दाखवून उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त केला मात्र अनेक वर्षांपासून अकृषक शेतसारा या कंपनीने भरलेला नाहीतर कुसुंबी येथील 18 आदिवासी कोलाम शेतकऱ्यांनी जमिनी परत द्या जमिनीचा मोबदला द्या व एका कुटुंबातील पात्र व्यक्तीला नोकरी द्या यासाठी गेल्या बारा वर्षापासून न्यायची प्रतीक्षा करीत आहे मात्र याबाबतची गंभीर दखल घेऊन शासन प्रशासनाने या आदिवासीला न्याय देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर अनेक आंदोलनात पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपाने शांत व समज देण्यात आली.

 मात्र यामुळे प्रश्न सुटत नाही हे पाहून अखेर आदिवासींच्या संयमाचा बांध फुटला व कुसुंबी येथील माईन क्षेत्रातील हापर मध्ये आज 29 ला जाऊन चुनखडी वाहतूक बंद पाडली व त्या ठिकाणी एकतर न्याय द्या अन्यथा जेल द्या अशी भूमिका घेऊन महिला पुरुष त्या ठिकाणी ठिय्या मांडला आहे यामुळे आदिवासी कोलामाचे कशा पद्धतीने माणिकगड ( अल्ट्रा टेक ) सिमेंट कंपनी शोषण करीत आहे.

 या प्रकरणाला प्रशासनाकडून देखील गंभीर दखल घेत नसल्यामुळे ऐन पावसाच्या तोंडावर प्रकरण चिघळण्याची चिन्ह दिसू लागली आहे. कंपनीने रस्ता बंद करणे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत नष्ट करणे जमिनी नियमबाह्य उत्खनन करणे शमशानभूमीवर कब्जा करणे अशा अनेक तक्रारी पोलीस प्रशासनाकडे व महसूल प्रशासनाकडे देण्यात आले आहे.

 मात्र कंपनीने वेळोवेळी आंदोलन दाबण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडे दबाव टाकून या गरीब दारिद्रयाच जीवन जगणाऱ्या आदिवासी कोलाम कुटुंबावर विविध  8 ते 9 गुन्हे दाखल केले असून न्यायालयामध्ये चक्रा काढण्याची नामुष्की मालक असून चोरासारखी या आदिवासींच्या माथी आली आहे.

 जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिदअली यांनीआदिवासींचा आता अंत पाहू नये त्यांच्या ज्या मागण्या आहे.

 ह्या रास्त असूनएकीकडे जल जंगल जमिनीवर अदिवासीच्या अधिकार देण्याच्या मोठ्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्याकडे या आदिवासींचे जमीन लुटून भांडवलदार उद्योजकाच्या घशयात टाकायच्या या प्रकार मुळेत्यांना बेघर करायचा ही बाब गंभीर असल्याने कुसुंबी नोकारी बॉम्बेझरी येथील संपूर्ण जमिनी भूमापन सीमांकन करण्यात यावे या ठिकाणी कंपनीकडून झालेल्या अन्याय अत्याचाराबाबत कारवाई करावी अशी मागणी आदिवासीनी केली असून मोबदला द्या अन्यथा आमच्या जमीन आम्हाला परत द्या अशी भूमिका घेतल्यामुळे या परिसरात वातावरण तापले आहे संतप्त आदिवासी आंदोलनकर्त्यांनी हापर बंद पाडले असून जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही न्याय द्या अन्यथा जेल द्या अशा भूमिका वर ठाम आहेत भिमा मडावी रामदास मंगाम अरुण उद्दे चिन्नु मुक्का आत्राम यशोदा सिडाम लक्ष्मी पेंदोर ताराबाई कुडमेथे लक्ष्मी मेश्राम जंगु पेंदोर यांचे सह प्रकल्प बाधीत आदिवासी ठिय्या मांडला आहे.




Post a Comment

0 Comments