चंद्रपूर शहरात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान रॅली

 



चंद्रपूर शहरात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान रॅली 

◾पीओके भारतात समाविष्ट करा, बौध्द गया चे महाविहार बौद्धांना सोपवा

◾आरपीआय आठवले जिल्हाध्यक्ष तोडे यांची पत्रपरिषदेत माहिती

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त केली. त्यांच्या या शौर्याबदल्ल भारतीय सेनाच्या सन्मानार्थ संपूर्ण भारतात तिरंगा सन्मान रॅली काढली जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानूसार गुरुवारी 29 मे रोजी डॉ. आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भारत झिंदाबाद यात्रा आणि तिरंगा सन्मान रॅली काढण्यात आल्याची माहीती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यात 22 मे ते 6 जून दरम्यान ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीदरम्यान, पीओकेमध्ये बोधगयाचा भारतात समावेश करावा आणि बोधगया चा महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या. यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना निवेदन सुपूर्द केल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, विदर्भ प्रदेश सरचिटणीस अशोक घोटेकर, जिल्हाध्यक्ष किरण गेडाम, चंद्रपूर शहर महिला शहराध्यक्ष अश्विनी रायपुरे, हंसराज वनकर, संदिप जंगम, प्रभाकर खाडे, नागसेन डांगे, शैलेश राखडे, गीता साखरे, सुप्रशील गेडाम, राहुल मून, प्रविण डोर्लीकर आदी सहभागी झाल्याची माहिती तोडे यांनी दिली.




Post a Comment

0 Comments