शेतीतील कचरा पेटविताना शेतकऱ्याचा जळून मृत्यू
◾बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव(पोडे) येथील घटना
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव(पोडे) येथील अल्पभूधारक शेतकरी मान्सूनपूर्व शेतीच्या कामासाठी शेतशिवारात गेला असता शेतातील नांगरणी-वखरणी करून शेतातील पुंजने जाळत असतांना आगीचे लोळ अंगावर आल्याने शेतकऱ्याचा शेतातच जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज बुधवारला सकाळी 11:00 वाजताच्या दरम्यान घडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुधाकर उध्दव पोडे, वय - 55, असे शेतकऱ्याचे नाव असून तो शेतीचे मशागतीचे काम करीत असतांना सदर घटना घडली, सुधाकर पोडे यांच्याकडे दीड-दोन एकड कोरडवाहू शेती असून मान्सूनपूर्व शेतीची मशागत करण्यासाठी भर उन्हात लगबग सुरू झाली आज बुधवारी सकाळी 8:00 वाजता सुधाकर पोडे आपल्या पत्नीसह वखर घेवून बंडीने शेतात गेला शेतातील जमिनीचे नांगरून-वखरून जमा केलेले पुंजने जाळत असतांना ध्यानी-मनी नसतांना आगीचा लोळ हा सुधाकरच्या अंगावर आल्याने सुधाकर हा डोक्यापासून ते कमरे पर्यंत जळाला व यातच त्याचा होरपळून मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेची माहिती माजी सभापती गोविंदा पोडे यांनी चंद्रपुर शहर पोलिस स्टेशनला दिली असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस उपनिरीक्षक शैलेश जगताप, लक्ष्मण रामटेके व मनोहर कांबळी यांनी घटनास्थळाला भेट दिली सदर घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करीता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे पाठविण्यात आले आहे या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे तसेच शासनाने सुधाकर पोडे यांच्या कुटुंबियाला मदत करावी अशी मागणी गावकऱ्यानी केली आहे.
0 Comments