भाजपा आर्णी तालुका द्वारा शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी भव्य शेतकरी मोर्चा

 


भाजपा आर्णी तालुका द्वारा शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी भव्य शेतकरी मोर्चा

◾राज्य सरकारने ओला दुष्काळाची घोषणा करावी,  प्रति हेक्टरी ५० हजाराची शेतकऱ्यांना मदत द्यावी,विम्याची राशी सरसकट द्यावी,महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर


यवतमाळ ( राज्य रिपोर्टर ) : शेतकऱ्यांच्या न्यायहक्काच्या मागण्यांसाठी आर्णी जि. यवतमाळ येथे भाजपा आर्णी तालुका च्या वतीने दि. ०१ नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे शेतकऱ्यांचे कैवारी नेते पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नेतृत्व करून राज्य सरकारने ओला दुष्काळाची घोषणा करावी, प्रति हेक्टरी ५० हजाराची शेतकऱ्यांना मदत द्यावी, विम्याची राशी सरसकट द्यावी, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घोषणेनुसार ५० हजार मदत तातडीने द्यावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. यावेळी आमदार एड. निलय नाईक, आमदार श्री. संदीप धुर्वे, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे, उद्धवराव येरमे, दिनकर पावडे, राजाभाऊ पडगिलवार, विपीन राठोड यांचेसह भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोर्च्यात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments