दोन युवकांचा बुडून मृत्यू अमलनाला धरण्याच्या घटना

दोन युवकांचा बुडून मृत्यू  अमलनाला  धरण्याच्या घटना

◾धरण्याच्या निघालेल्या वेस्ट वेअर वर पर्यटनच या उद्देशाने गेलेले दोन तरुणांना जलसमाधी मिळाली

गडचांदूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरपना यातालुक्यातील डोंगराळ भागत अमलनाला धरण आहे. या धरण परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेन्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. पर्यटक देखील याठिकाणी गर्दी करतात. मात्र या परिसराचा अजूनही पर्यटन स्थळ म्हणून विकास झालेला नाही. त्यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

 धरण्याच्या निघालेल्या वेस्ट वेअर वर पर्यटनच या उद्देशाने गेलेले दोन तरुणांना जलसमाधी मिळाली घटना आज मंगलवार 14 सेप्टेंबर दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोरपना तालुक्यातील अमलनाला  धरण्याच्या सोडणारा घडली.

कोरपना तालुक्यातील अमलनाला धरण सत्याचा पावसामुळे तुडुंब भरून धरण ओव्हरफ्लो झाला आहे. सांडव्यावरून भरभरून पाणी बाहेर पडत आहे.  दुपारच्या सुमारास चार ते पाच तरुण पर्यटक या उद्देशाने वेस्ट वेअर वर गेले होते दरम्यान वेस्ट वेअर मध्ये पर्यटन करताना त्यापैकी दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतकाचे नाव नदीम फिरोज अली ( 21 ) रा. बल्लारपूर,  तोपिक निसार शेख ( 22 ) विहिरगाव अशी आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुडलेल्या युवकांना बाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छदन  साठी ग्रामीण रुग्णालय पाटवले.  सदर ठिकाणी बऱ्याच वेळ दुर्घटना घडली आहे. आज पुन्हा एकदा त्याच त्याच ठिकाणी दोन युवकांना जलसमाधी मिळाली आहे. पोलीस प्रशासनाने सदर क्षेत्रामध्ये पर्यटक ला जाण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.






Post a Comment

0 Comments