बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा


बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा

आमदार प्रतिभा धानोरकर यांचे कृषीमंत्र्यांना निवेदन


चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): आपल्या भागामध्ये माेठया प्रमाणात कापुस व सोयाबीनची पिके प्रामुख्यांने घेण्यात येते. परंतु बि-बियाणे बोगस निघल्याने ती उगवलीच नसल्याची गंभीर बाब समाेर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. बोगस बि-बियाने विक्रेत्यांवर कारवाई करून शेतकèयांना आर्थीक नुकसान भरपाई करा. अशी मागणी  आमदार  प्रतिभाताई धानोरकर यांनी कृषीमंत्री  दादाजी भुसे यांना केली आहे.
याबाबत शेतकऱ्यांच्या  तक्रारी प्राप्त झालेल्या असुन शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापुस या पिकांची पेरणी केलेली आहेत. परंतु कृषी केंद्राकडून घेण्यात आलेली बि-बियाणे ही बोगस असल्यामुळे ती उगवलेली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार माेठे प्रमाणात नुकसान झालेले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे आधीच शेतकरी हा फार माेठ्या विवंचनेत सापडलेला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सव्र्हे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा तात्काळ बि-बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कृषीमंत्री दादाजी भुुसे यांना केली आहे.  

Post a Comment

0 Comments