रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाकरीता आवश्यक 53 रू. कोटी निधी तातडीने उपलब्ध करावा – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
चंद्रपुर, राज्य रिपोर्टर : चंद्रपूर जिल्हयात ग्रामीण भागातील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाकरीता आवश्यक 53 कोटी रू. निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.
याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांना ई-मेल द्वारे पत्रे पाठविली आहे. रमाई आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्हयास सन 2016-17 ते सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये एकुण 11818 घरकुल बांधकामचे उद्दिष्ट मंजुर आहे. त्यापैकी 4356 घरकुलांचे बांधकाम पुर्ण झालेले असुन उर्वरित 7462 घरकुलांचे कामे विविध स्तरावर अपुर्ण आहेत तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरीता 4094 लाभार्थीची निवड प्राप्त असून ऑनलाईन मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मंजुर लाभार्थ्यांनी जुने घर मोडुन बांधकामाचे साहीत्य गोळा केलेले आहे. परंतु राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृह निर्माण विभाग यांचे स्टेट नोडल अकाऊंट मध्ये सादर योजनेचा निधी नसल्याने लाभार्थीना निधी वितरीत करता येत नाही त्यामुळे वरीलप्रमाणे 7462 घरकुलांची कामे विविध स्तरावर खोळंबलेली असुन खालील प्रमाणे हप्ते निहाय निधीची आवश्यकता आहे.
प्रथम हप्ता वितरणाकरीता 1738 लाभार्थ्यांसाठी 347.6 लक्ष इतका निधी आवश्यक आहे. द्वितीय हप्ता वितरणाकरीता 2454 लाभार्थ्यांसाठी 1104.3 लक्ष इतका निधी आवश्यक आहे. तृतीय हप्ता वितरणाकरीता 2160 लाभार्थ्यांसाठी 972.00 लक्ष इतका निधी आवश्यक आहे. चौथा हप्ता वितरणाकरीता 2155 लाभार्थ्यांसाठी 431.00 लक्ष रू. इतका निधी आवश्यक आहे. अपुर्ण बांधकामाकरीता रू. 2854.9 लक्ष इतका आहे. 2019-20 मधील नव्याने मंजुर लाभार्थीकरीता एकुण आवश्यक निधी रू. 5322.20 लक्ष इतका आहे. ग्रामीण भागातील रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेता शासनाने तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.




0 Comments