राजभवन भेट योजना ३१ मार्च पर्यंत स्थगित

राजभवन भेट योजना ३१ मार्च पर्यंत स्थगित
                             

मुंबई, दि. 16 : दिनांक १७ मार्च ते दिनांक ३१ मार्च २०२० या कालावधीत नागरिकांसाठी राजभवन भेटीची योजना स्थगित करण्यात आली असल्याचे राजभवनातून जाहीर करण्यात आले.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
या कालावधीत ज्या लोकांनी राजभवन भेटीसाठी आरक्षण केले आहेत्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईलव त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल, असेही कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments