नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार
कुठेही गर्दी होता कामा नये अशा सूचना
मुंबई दि २६: सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने, औषधांची दुकाने ही २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी करोना उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.
लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात, असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले.



0 Comments