मानवजातीच्या अस्तित्वासाठी सत्तारुढ, विरोधी पक्षांसह जनतेची एकजूट महत्वाची

कोरोना विरुद्धचा लढा मानवजातीच्या अस्तित्वासाठी
सत्तारुढविरोधी पक्षांसह जनतेची एकजूट महत्वाची
                                                                         उपमुख्यमंत्री अजित पवार
         मुंबईदि.30 :- कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी सत्तारुढविरोधीपक्षांसह तमाम जनतेची एकजूट महत्वाची आहे. कोरोना विरुद्धचा लढा राज्यदेशांच्या सीमेपलिकडचा मानवजातीच्या अस्तित्वाचा लढा असल्याने या लढाईत एकजूटीनेएकाच दिशेने प्रयत्नांची गरज आहे. वैयक्तिक स्वार्थपक्षीय मतभेद तुर्तास बाजूला ठेवून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सर्वजण एकजूटीने प्रयत्न करतीलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगून यापुढचे दोन आठवडे नागरिकांनी भेटीगाठीगर्दी टाळून घरातच थांबावेअसे आवाहन त्यांनी केले आहे.
            महाराष्ट्रात काम करणाऱ्या परराज्यातील मजूरांनी जीव धोक्यात घालून प्रवास करु नयेअसे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. परराज्यातील मजूरांसाठी राज्यात ठिकठिकाणी शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. मजूरांच्या गरजेनुसार आता जिथे ते आहेत त्याठिकाणी प्रशासनातर्फे निवास आणि भोजनाची मोफत सोय करण्यात येत आहे. प्रशासनाच्या बरोबरीनं स्वयंसेवी संस्था त्यासाठी योगदान देत आहेत. राज्यात शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पुढचे तीन महिने शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे गरीबांचे पोट भरण्यास मदत होणार आहेअशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments