चंद्रपूर जिल्ह्यात जमावबंदी,144 कलम लागू


कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रशासन सक्त
चंद्रपूर जिल्ह्यात जमावबंदी,144 कलम लागू



Ø  सर्व दुकाने फक्त 11 ते उघडा
Ø  जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नियमित वेळी
Ø  चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यत विदेशातून आलेल्या 45 नागरिक निगराणीखाली
Ø  आतापर्यंत एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही
Ø  लंडनवरून आलेले 3 रूग्णांचे होम कोरेन्टाईन
Ø  विदेशातून येणाऱ्या नागरीकांना कोरेन्टाईन स्टॅम्प मारणार
Ø  फिलिपाईन्स वरून आलेल्या 2 नागरिकांना होम कोरेन्टाईनचे निर्देश
Ø  रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन
Ø  होम कॉरेन्टाईन असणाऱ्या नागरिकांना स्टॅम्प मारण्याची प्रक्रीया सुरु
Ø  बोगस सॅनीटायझर विक्रेत्यावर कारवाई
Ø  टूर ऑपरेटरखासगी बसेसवाल्यांना विदेशी नागरिकांची नोंद अनिवार्य
Ø  अधिकचे पैसे घेणाऱ्या खासगी वाहनधारकांची आरटीओकडे लेखी तक्रार करा
Ø  चंद्रपुरातील सर्व कॅरम क्लब बंद करण्याचे आवाहन
Ø  गरज पडल्यास पोलीस विभागाचा सहभाग वाढवणार
चंद्रपूर, दि. 19 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असून या काळामध्ये नागरीकांचा परस्परांची संपर्क येऊ नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जमाव बंदीची 144 कलम लागू करण्यात येत असल्याची घोषणा आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केली आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यात कुठेही पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. फिलिपाइन्स वरून आलेले दोन नागरिकांसह चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून आलेल्या 45 नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.मात्र जिल्ह्यात एकही पॉझिटिव रुग्ण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
      कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आज उपाय योजना संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीजिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोडवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन. मोरे.जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गहलोत याशिवाय जिल्हा परिषद,महानगरपालिका व विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजना व नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद याबाबत चर्चा करण्यात आली .नागरिकांनी कोरोना संसर्ग ही बाब अतिशय गंभीरतेने घेऊन गरज नसताना बाहेर पडूच नये ,अशी सूचना या बैठकीत अनेकांनी केली. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबापासून दूर घरीच एकांतात राहणे योग्य ठरेल ,असा वैद्यकीय सल्ला यावेळी देण्यात आला.
         त्यामुळे उद्या 20 मार्चपासून जिल्ह्यामध्ये जमावबंदी प्रतिबंधक लम 144 लागू करण्‍यात येत आहे.सार्वजनिक ठिकाणी आणि पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यासाठी या कलमाद्वारे मज्जाव करण्यात येतो. नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नयेअनावश्यक प्रवास टाळावाअसे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केला आहे.
             चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 45 झाली आहे. हे सर्व नागरिक धोक्याबाहेर आहेत. लंडनहून आलेल्या 3 नागरीकांना होम कोरन्टाईन करण्यात आले आहे.त्यानंतर नागपूर वरून आलेल्या एका संशयित रूग्णाबाबतचा अहवालही निगेटिव्ह असून तो धोक्याबाहेर आहे.
        फिलिपाइन्स वरून आलेल्या 2 नागरिकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये सध्या बोगस आणि सॅनिटायझेशन विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 मेडिकल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आज स्पष्ट आदेश दिले आहेत की पुण्यावरून येणाऱ्या कोणत्याही खाजगी वाहतूक धारकांनी अधिकचे पैसे घेतले असल्यास त्याची थेट तक्रार आरटीओ कार्यालयात प्रवाशांनी करावी. या ट्रॅव्हल एजंट वर कारवाई करण्याचे निर्देश आज बैठकीत उपस्थित उपप्रादेशिक अधिकारी शिंदे यांना देण्यात आले आहे .
         जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्तदात्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान करणे बंद केले. याबाबत आज बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात रक्ताचा तुटवडा भासतो आहे. महाराष्ट्र मध्ये दर दिवशी साडेचार ते पाच हजार रुग्णांना रक्ताची गरज असते. रक्तदात्यांना मध्ये रक्तदान करण्याविषयी भीती अथवा संभ्रम निर्माण झालेला असू शकतो. मात्र सद्यस्थितीत रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची अत्यंत गरज असून मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात यावेअसे आव्हान आजच्या बैठकीत करण्यात आले. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय यामध्ये विशेष काळजी घेतली जाईल ,असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कोरोनाच्या लढाई सोबत रक्तदानाचे आवाहनही नागरिकांनी स्वीकारावेअसे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले.
      जिल्ह्यामध्ये 11 ते ते पर्यंत सर्व प्रकारची व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या दुकानासमोर साबणसॅनीटायझरहात धुण्याची सुविधा उपलब्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे. भाजी दूध औषधे हे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र सकाळी पासून रात्री उशिरापर्यंत सुरु राहतील ,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नसून तूर्तास 11 ते 6 पर्यंत सर्व दुकाने उघडे ठेवता येणार आहे.
       विदेशातून येणाऱ्या नागरिकांचे होम कॉरेन्टाईन करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने संशय आल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदेशातून चंद्रपूर मध्ये आलेल्या सर्व प्रवाशांची प्रशासन संपर्क साधत आहे. संशयित रुग्ण किंवा परदेशातून आलेल्या नागरिकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्या गेल्यास पोलिसांची मदत घेण्याचे सुद्धा निर्देश आज देण्यात आले.

Post a Comment

0 Comments