देशातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल आनंद; ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे आभार -- उपमुख्यमंत्री अजित पवार

देशातील पहिले दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याबद्दल आनंद;
कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे आभार
                                                     --  उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबईदि. 25 :- देशातील पहिले कोरोनाबाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारीकर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही  मानले आहेत.
            राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूधभाजीपालाफळेऔषधेअन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेलअसा विश्वास देतांनाच उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना खरेदीसाठी गर्दी करु नये,  नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावीअसं आवाहन केलं आहे.
            अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलंचपरंतु जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाहीयाची दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईलअसा इशाराही त्यांनी दिला आहे.
            सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावंअसं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. 
            अमेरिकेनं लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनं अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणं टाळावंअसं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं  आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातील मुद्दे..
Ø देशातील पहिले दोन रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याचा आनंद..
Ø कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व आभार
Ø संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत
Ø दूधभाजीपालाफळेऔषधेअन्नधान्यजीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाहीपुरवठा यापुढेही कायम नियमित सुरु राहिल.
Ø बाजारात खरेदीसाठी गर्दी करु नये. सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी करावी.
Ø रस्त्यावरबाजारातदुकानात इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
Ø जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठाकाळाबाजारजादा दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करणार..
Ø राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या गंभीर.
Ø नागरिकांनी गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नयेकाळजी घ्यावी.
Ø अमेरिकेत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेण्यात आली. 
Ø महाराष्ट्रात ही वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी वेळीच सावध होऊनआवश्यक ती काळजी घ्यावी.

Post a Comment

0 Comments