भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवणार; जनतेने खरेदीसाठी गर्दी करु नये -- उपमुख्यमंत्री अजित पवार

भाजीपालादूधअन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
कायमस्वरुपी सुरळीत ठेवणारजनतेने खरेदीसाठी गर्दी  करु नये
                                       --  उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य प्रवेशबंदीजिल्हाबंदीसंचारबंदीची कठोर अंमलबजावणी;
पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्यनागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे
            मुंबईदि. 24 :- ‘कोरोनाच्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदीजिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईलत्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. भाजीपालाफळेदूधअन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. कोरोनाच्या धोक्यापासून दूर राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची स्वत:ची असून त्याप्रमाणे त्यांनी वर्तन ठेवावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
            राज्यात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिकांकडून बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. नागरिक अकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यशासनाचा आरोग्य विभागपोलिस विभागमहापालिकानगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचेप्रशासनातील अधिकारी-कर्मचारी सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. राज्याच्या प्रत्येक घरातला माणूस कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त रहावा यासाठी ते धोका पत्करत असतानाजनतेनेही संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावीअसे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
            कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून सर्वांनी घरी बसून सहकार्य करावे. सुदैवानेराज्यातला कोरोनाचा प्रसार अद्याप मर्यादित आहे. काही बाधित व्यक्ती कोरोनामुक्तही झाल्या आहेतही चांगली लक्षणे असल्याचे सांगून, ‘कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येकानं घरी बसून योगदान द्यावंअसं  आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.                

मा. उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनातील मुद्दे
v राज्यप्रवेशबंदीजिल्हा प्रवेशबंदीसंचारबंदीची कठोर अंमलबजावणी,
v  पोलिसांना अंमलबजावणीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य
v  नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावं. खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये.
v  भाजीपालाफळेअन्नधान्य जीवनावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणार.
v जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही सरकारची जबाबदारी.
v  कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार
v  भाजीपालाफळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येणारत्यांचं नुकसान होणार नाही, 
v  राज्यातील आरोग्य अधिकारीकर्मचारीपोलिस  चांगलं काम करत आहेत.
v आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरुव्हेंटीलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु.
v मास्कसॅनिटायझरऔषधेजीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठाकाळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकणार.

Post a Comment

0 Comments