राज्यपालांची सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा; नागरिकांचे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश

राज्यपालांची सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा;
 नागरिकांचे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश
मुंबईदि. २८ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण व लोकांचे  स्थलांतर याबाबत माहिती घेतली.
          करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेअशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली.सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावेअसे राज्यपालांनी सांगितले.
          ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेतत्यांना देखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले.
 राज्यपालांनी नागपूरअमरावतीनाशिकऔरंगाबादकोकण व पुणे येथील विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.      

Post a Comment

0 Comments