बल्लारपूर वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय : बल्लारपुरातील मोठ्या व्यापाऱ्यांवर हल्ला : अज्ञात दुचाकीचालक रोख रक्कम घेऊन पसार

 


बल्लारपूर वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय : बल्लारपुरातील मोठ्या व्यापाऱ्यांवर हल्ला : अज्ञात दुचाकीचालक रोख रक्कम घेऊन पसार         

             


बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहरातील स्थानिक विवेकानंद वॉर्ड येथील पान मटेरियल चे प्रसिध्द व्यापारी काल रात्री 9:00 वाजताच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी जात असतांना एका अज्ञात दुचाकी चालकाने(सह 1 आरोपी) अशा 2 अज्ञात इसमानी या प्रसिध्द व्यापाऱ्यांवर हल्ला केला व त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पसार झाले.

 या दरम्यान झालेल्या झटापटीत पान मटेरियल चे प्रसिध्द व्यापारी सदर हल्ल्यात जखमी झाले असून विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार सदर व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर जबर मार असून त्यांचेवर चंद्रपुरात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तसेच गुप्त सूत्राच्या माहितीनुसार वृत्त येई पर्यंत यासंदर्भात अजूनही पोलीस तक्रार दाखल न झाल्याची माहिती आहे.

 दिवसेंदिवस बल्लारपूर शहरात वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनत चालली आहे दिवसाढवळ्या बंदुकीने गोळीबार होतो शिवाय काही ठिकाणी शस्त्राचा सुध्दा वापर होताना दिसतो त्यामुळे येत्या काही दिवसात बल्लारपूर शहर गुन्हेगारांचा अड्डा तर बनणार नाही ना असा प्रश्न जनसामान्य नागरिक करीत आहे.

 एका मोठ्या प्रसिध्द व्यापाऱ्यावर हल्ला होत असतांना सामान्य नागरिक खरच स्वतःला सुरक्षित समजणार का ? बल्लारपूर शहरात प्रशस्त पोलीस स्थानकाची निर्मिती तर झाली मात्र पुरेशा प्रमाणात पोलीस बांधवांची पदस्थापणा नाही शिवाय अनेक पोलीस बांधवावर अतिरिक्त कामाचा तणाव असतोच शिवाय बल्लारपूर शहरात वाढती लोकसंख्या, विस्तार पाहता पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असून यामुळे नागरिकांनी स्वतःला सुरक्षित असल्याची जाणीव होईल.

Post a Comment

0 Comments