बल्लारपूरात लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होणार, 9 जानेवारी पासून पाणी पुरवठा नियमित होणार : बल्लारपूरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात मा.आ सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी घेतली बैठक

 


बल्लारपूरात लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होणार, 9 जानेवारी पासून पाणी पुरवठा नियमित होणार : बल्लारपूरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात मा.आ सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी घेतली बैठक        

 बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहरात मागील काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे तसेच एन हिवाळ्यात उन्हाळ्यासारखी पाणी टंचाई भासत आहे.

 या संदर्भात बल्लारपूर शहरातील नागरिकांनी मा.आमदार सुधीरभाऊंच्या पुढे आपली कैफियत मांडली असता भाऊंनी पुढाकार घेऊन बल्लारपूर शहरातील पाणी पुरवठा कायम सुरळीत व्हावा याविषयी आवश्यक संसाधने उपलब्ध करून सर्व अडचणी दूर कराव्या व नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करावा तसेच पाणी पुरवठ्यासंदर्भात नागरिकांना होणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही.

 असे निर्देश मा.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले  यानुसार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. झळके यांनी येत्या 9 जानेवारी पासून बल्लारपूर शहरातील पाणी पुरवठा नियमित होईल असे आश्वासन दिले नागरिकांच्या पाणी पुरवठा तील तक्रारीवरून मा.आ.सुधीरभाऊनी आज त्वरित मा.हरीश शर्मा, नगराध्यक्ष बल्लारपूर, मा.विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी बल्लारपूर, मजीप्रा चे अधीक्षक अभियंता श्री. गव्हाणकर, कार्यकारी अभियंता श्री. झळके, श्री. घोडमोरे, यांच्या सोबत बैठक घेतली. वर्धा नदीवरील 2 पंप नादुरुस्त असल्यामुळे एक दिवसाआड  तसेच अनियमित  पाणी पुरवठा होत असल्याची माहिती मजीप्रा च्या अधिकाऱ्यांनी दिली लवकरच यावर उपाययोजना करून येत्या 9 जानेवारी पासून बल्लारपूरकराना नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन मजीप्राच्या वतीने देण्यात आले आहे.

 तसेच याबाबत बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी 5 जानेवारी रोजी बैठक घेऊन आढावा घ्यावा  अशी सूचना सुधीरभाऊनी केली तसेच या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे निधी किंवा संसाधनाबाबत अडचण असल्यास सविस्तर माहिती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले त्या अनुषणगाने पाणी पुरवठा मंत्र्यासह बैठक घेऊन आपण योग्य तोडगा काढू असेही आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.

Post a Comment

0 Comments