ही स्थिरता विरूद्ध अस्थिरतेची निवडणूक

 






ही स्थिरता विरूद्ध अस्थिरतेची निवडणूक

◾मोदींच्या हस्ते फुटला महायुतीच्या प्रचाराचा नारळ

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : 2024 ची लोकसभा निवडणूक स्थिरता विरुद्ध अस्थिरतेची निवडणूक आहे. एनडीएचे ध्येय देशासाठी कठोर आणि मोठे निर्णय घेणे, हे आहे. काँग्रेस इंडीचा मंत्र 'जेथेही सत्ता मिळेल, तेथे मलाई खायची', हा आहे. त्यांनी देशाला अस्थिर केले आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक आहे, हे महाराष्ट्रापेक्षा कोण जास्त समजू शकेल. अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राची उपेक्षाच झाली. राज्याच्या सत्तेतही त्यांनी स्वतःच्या परिवाराचाच विकास केला. कुणाचा किती हिस्सा असेल, कोणता ठेका कुणाला मिळणार, हेच धंदे करून त्यांनी आजवर महाराष्ट्राचे अहित केले, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्यांवर भरपूर प्रहार केले.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमुरचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोमवार 8 एप्रिलला चंद्रपुरातील मोरवा विमानतळाजवळील मैदानात पार पडली.

यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार ( चंद्रपूर ) , अशोक नेते ( गडचिरोली ), आ.किशोर जोरगेवार,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,राहुल पावडे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.

यावेळी मोदींनी काँग्रेस नेत्यांना कारल्याची उपमा देत भरपूर प्रहार केले. 'कारले तुपात घोळा किंवा साखरेत, ते कडूचे कडूच', असे मराठीतून म्हणत मोदींनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.

माता महाकालीच्या पावन भूमीत शक्तीला नमन. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. चंद्रपूरकरांना माझा नमस्कार, असे म्हणत मोदींनी भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले, देशात गरमीचा पारा वाढत आहे आणि सत्तेच्या सारीपाटाचाही पारा चढत आहे. पण तुमच्या उत्साहात कुठेही कमतरता दिसत नाही. यावेळी चंद्रपूरनेही ठरवले आहे की फीर एक बार मोदी सरकार. चंद्रपुरातून येवढे प्रेम मिळणे माझ्यासाठी गौरव आहे असे ते म्हणाले.

गडचिरोली होणार स्टील सिटीकाँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्राची व विदर्भाची उपेक्षा झाली.सुरू असलेले सर्व प्रकल्प बंद करण्यात आले.महायुतीने सर्व प्रकल्प सुरू करून पूर्णत्वास नेले.गडचिरोली येथील नक्षलवाद आता संपला आहे.तेथे लोह खनिज मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे उद्योग उभारून गडचिरोलीला आता स्टील सिटी करता येईल अशी महिती मोदी यांनी दिली.

 हिंदू धर्माची शक्ती राहुल  गांधी नष्ट करू शकत नाहीराहुल गांधी यांनी हिंदूधर्माचे शक्तीस्रोत नष्ट करण्याची भाषा केली.हिंदुधर्माचा शक्तीस्रोत मातृशक्ती(महिला)असून राहुल गांधी हे कधीच करू शकणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,काँग्रेसने देशाला मागे ढकलले,जितकी कामे काँग्रेसच्या राज्यात झाली नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कामे मोदींच्या नेतृत्वात झाली आहेत,आता काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा द्यावा.

जात-पात नाही तर विकासाच्या मुद्यावर बोलाआमदारकीच्या 3 दशकात अनेक विकास कामे केली. ती कामे काँग्रेसला दिसत नाही. 1 ची 17 दारू दुकाने करणे आहे, याला विकास म्हणायचा का.? मी लोकसभेत गेलो तर, हा मतदारसंघ देशात अव्वल असेल अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी अशोक नेते यांनी समयोचित मार्गदर्शन केले.हरीश शर्मा यांनी आभार मानले.






Post a Comment

0 Comments