आयुष्यमान भारत कार्ड Ayushman Bharat Card ( Golden E-Card ) ला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
नागरिकांनी लवकरात लवकर या योजनेचे कार्ड काढून घ्यावे 31 डिसेंबर 2022 पर्यंत
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आरोग्य विमा योजना असून केंद्र शासन तथा राज्य शासनाद्वारे राबविण्यात येत आहे. या आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून प्रति कुटुंब प्रतिवर्ष रु. 5 लक्ष पर्यंत 1209 सर्जिकल व मेडिकल उपचाराच्या माध्यमातून, मान्यताप्राप्त खाजगी व शासकीय रुग्णालयामार्फत मोफत सेवा देण्यात येत आहेत.C.S.C available under Ballarpur city. center
आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये पात्र लाभार्थी हे सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 यादी अनुसार समाविष्ट करण्यात आले आहेत. या यादीनुसार पात्र असलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड ची आवश्यकता असून 31 डिसेंबर 2022 पर्यंत ते वितरित होणार आहे. हे कार्ड काढण्यासाठी लाभार्थी नागरिकांस स्वतः खाली दिलेल्या जवळच्या केंद्रामध्ये उपस्थित राहून E-KYC करने गरजेचे आहे.
बल्लारपुर शहर अंतर्गत उपलब्ध सी.एस.सी. केंद्र :
1) ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर,
2) कमल ग्राफिक्स - रेल्वे चौक पोस्ट ऑफिस जवळ, बल्लारपूर,
3) साई ऑनलाईन सर्व्हिसेस जनता शाळेजवळ ( वस्ती विभाग, गांधी वॉर्ड) बल्लारपूर,
4) मालोथ मल्टी सर्विसेस - तिन एक्का गेट जवळ शिवाजीनगर वॉर्ड, बल्लारपूर येथे सुध्दा आयुष्मान कार्डची सेवा उपलब्ध आहे.
लाभार्थ्यांनी आपल्या जवळ असलेले आधार कार्ड, मोबाईल, माननीय प्रधानमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र किंवा राशन कार्ड ( मुळ प्रत ) इत्यादी E-KYC करण्यासाठी सोबत आणणे आवश्यक आहे.
काही अडचण असल्यास आपल्या वार्डामधील आशा वर्कर अथवा आरोग्य सेविकेस संपर्क करावा अन्यथा सरकारी दवाखान्यामध्ये संपर्क करावा. पात्र लाभार्थी नागरिकांनी लवकरात लवकर या योजनेचे कार्ड काढून घ्यावे असे आवाहन मा. मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांनी केले आहे.
0 Comments