खबरदारीमुळे मोठी दुर्घटना टळली ; पेपर मिल बल्लारपूर

 






खबरदारीमुळे मोठी दुर्घटना टळली ; पेपर मिल बल्लारपूर

 ◾बल्लारपूरच्या पंडित दीनदयाल वार्डाला लागून असलेला बांबू डेपो सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी 

◾जंगलातील आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : गेल्या आठवड्यात पेपर मिलच्या कळमना बांबू डेपोला लागलेल्या भीषण आगीनंतर बल्लारपूरच्या पंडित दीनदयाल वार्डाला लागून असलेला बांबू डेपो सुरक्षिततेच्या दृष्टीने येथून सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी होत आहे.

 व या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश महासचिव  श्री. अजय दुबे यांनी प्रशासनाला निवेदन सुध्दा दिले होते. 


दरम्यान आज अचानक या बांबू डेपो संकुलातील जंगलातून धूर निघू लागला. अचानक कुठूनतरी आगीच्या ज्वालाच्या ज्वाला निघू लागल्या. हे पाहून बल्लारपूर पेपर मिलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार श्री. संजय राईचवार, पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी घटनास्थळ गाठून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यास सुरुवात केली. उपविभागीय अधिकारी बल्लारपूर दिप्ती सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली व कंपनी व्यवस्थापन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

 जंगलातील आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.  यानंतर दोन जेसीबी लावून गाळाच्या काठावरील संपूर्ण झुडपे साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर नगरपरिषद आणि पेपर मिलच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.  वेळीच युद्धपातळीवर काम सुरू केल्याने मोठी दुर्घटना टळली.  कळमनासारख्या डेपोला आग लागली असती तर मोठी हानी होऊ शकली असती. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचे सदर घटनेवर लक्ष ठेवून आहे.



Post a Comment

0 Comments