माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राजुरा नगर परिषद ने घेतली हरित शपथ

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राजुरा नगर परिषद ने घेतली हरित शपथ

 राजुरा (राज्य रिपोर्टर) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 2 ऑक्टोंबर 2020 ते 31 मार्च 2021 या सहा महिन्याचे कालावधीत राबविण्यात येणार आहे.

 या अभियानाचा उद्देश निसर्गाशी असलेली कटिबद्धता व या माध्यमातून पृथ्वी,जल, अग्नि,आकाश या पंचातत्वाचे संरक्षण व संवर्धन करणे हा आहे. वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग म्हणून दिनांक 1 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरित शपथ द्यावयाची आहे.

राज्यातीलजास्तीत जास्त नागरिकांना अशी हरित शपथ घेण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून, महानगरपालिका, नगरपंचायत/ नगरपरिषद स्तरावर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2021 रोजी कोरोना संबंधातील सर्व प्रोटोकॉल विचारात घेऊन छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आली.

 नवीन वर्षाचे औचित्य साधून मा. अध्यक्ष अरुणभाऊ धोटे, मा. उपाध्यक्ष सुनील देशपांडे, मा.नगरसेवक आनंद दासरी,मा.हरजीत सिंग संधू. यांच्या उपस्थितीत हरित शपथ घेण्यात आली. 

सदर शपथविधीत 50 - 60 नागरिकांनी सहभाग नोंदविला असून यावेळी मा. अध्यक्ष अरुण भाऊ धोटे मार्गदर्शन करताना सांगितले की,सदर अभियानाचा उद्देश निसर्गाशी असलेली कटिबद्धता व या माध्यमातून पृथ्वी,जल, अग्नी,आकाश व वायू या पंचतत्वांचे जतन व संवर्धन करणे आहे.

याच माध्यमातून  नगर परिषद राजुरा ने जलसंवर्धन करणेकरिता राजुरा नगर परिषद समोरील मामा तलाव मधील जलपर्नि/इक्रोनिया काढण्याचे उपक्रम हाती घेतले आहे.यात मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मेकॅनिकल कनवियन बेल्ट च्या साह्याने तलावाची स्वच्छता अभियान सुरू आहे.  करिता आपले राजुरा शहराला निसर्ग दृष्ट्या स्वच्छ ,सुंदर बनविणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.आणि सर्वांनी ती पाळली पाहिजे व राजुरा शहराला स्वच्छ व सुंदर करण्यास सहकार्य करावे या बाबत नागरिकांना आव्हान केले.

Post a Comment

0 Comments